38 गुंठे क्षेत्रात प्रत्येकी पाच गुंठ्यांत विविध पिके निवासी सोसायट्यांना मालाची थेट विक्री
पुणे जिल्ह्यातील चिंबळी (ता. राजगुरुनगर) येथे सौ. सीमा जाधव आपल्या 38 गुंठे क्षेत्रातील शेतीची जबाबदारी सांभाळतात. यात प्रत्येकी पाच गुंठे क्षेत्रावर त्यांनी भाजीपाला व त्यातही परदेशी भाजीपाल्याची शेती केली आहे. आपल्या शेतीमालाला ग्राहकांची थेट बाजारपेठही मिळवली आहे. दिवसभर आपले वेळापत्रक व्यस्त ठेवून आपल्या शेतीच्या विकासासाठी अखंड झटणाऱ्या सीमाताई या समस्त शेतकरीवर्गासाठी आदर्शच म्हणायला हव्यात.
सीमा जाधव यांचा विवाह चंद्रकांत जाधव यांच्याशी झाला तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे पती चाकण परिसरातील कंपनीमध्ये तात्पुरत्या नोकरीवर कार्यरत होते. त्यांच्या अल्पशा पगारावर घरचा उदरनिर्वाह होत नव्हता. आपणही हातभार लावावा म्हणून तीन एकर खडकाळ, मुरमाड, उताराच्या व पडीक जमिनीवर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यातील 38 गुंठे जमीन ट्रॅक्टर मजुरांच्या साहाय्याने लागवडीयोग्य केली. सुरवातीला वांगी, मिरची व पालेभाज्या घेण्यास सुरवात केली. त्याची विक्री चाकण व भोसरी मार्केट येथे सुरू केली. वाहतुकीला 400 रुपये भाडे द्यावे लागे. भाजीपाल्याची तोडणी, खुरपणी, फवारणी, कीडनाशके यावर मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. हाती नफा फारच कमी लागे. त्याच वेळी परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्याकडून तीन दिवसांचे भाजीपाला लागवड ते विक्रीपर्यंत प्रशिक्षण मार्गदर्शन घेतले.
परदेशी भाजीपाल्याची सुरवात -- बाजारपेठेचा अभ्यास करून परदेशी भाजीपाला पिकवण्यावर भर दिला. बियाणे खरेदी करून आणून त्यांची रोपवाटिका तयार केली. स्वतः तयार केलेल्या रोपांची लागवड सुरू केली. यामध्ये गादीवाफा पद्धतीचा वापर केला.
शेतीतील नियोजन पाणी - शेतात पाण्याच्या सुविधेसाठी एक बोअरवेल घेतला. सध्या त्याला चांगल्या प्रमाणात पाणी आहे. मात्र, त्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्याचा संचही शेतात बसवला, त्यासाठी 40 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. बेडवरती ठिबकसह पॉलिमल्चिंग पेपरचा वापर केला. मल्चिंगमुळे खुरपणीचा त्रास कमी झाला. पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत झाली. पिकांना दररोज अर्धा तास ठिबकने पाणी दिले जाते.
पोषण, पीक संरक्षण व्यवस्थापन - सीमाताई सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवतात. त्यामध्ये गांडूळ खत, नीम पेड, करंज पेड यांचा वापर होतो. करंज पेंडीची खरेदी पिरंगुट, तर निमपेंड चाकण येथून आणली जाते. किडींच्या नियंत्रणासाठी गोमूत्र, निंबोळी अर्क आदींचा वापर होतो.
सुमारे 38 गुंठे क्षेत्रातील पिकांचे नियोजन - प्रत्येक पीक सुमारे पाच गुंठे क्षेत्रात
- ब्रोकोली, लाल कोबी, लीक, आईसबर्ग, चेरी टोमॅटो, लाल कोबी, ढोबळी मिरची, वांगी, कारली, काकडी आदी पिके मागणीनुसार वर्षभर क्षेत्र बदलून घेतली जातात
- मागणीप्रमाणे ताजा व चांगला भाजीपाला पुरवला जातो
सध्या मिळत असलेले दर (रुपये प्रति किलो) रेड कॅबेज - 40 ते 50 रुपये, कमाल 70 ते 80
ब्रोकोली - 40 ते 70 रुपये, कमाल 120
चायनीज कॅबेज - 40 ते 70 रुपये
लीक - 60, बहुतांशी पुणे मार्केटला माल जातो.
आईसबर्ग - 65 ते 70 रुपये
ढोबळी मिरची - 40 रुपये
साधी मिरची - 30 ते 40 रुपये
(ऋतूंप्रमाणे दरांत चढ-उतार होतात)
प्रति दिन जमा-खर्च - - दररोज सुमारे 100 किलो भाजीपाला विक्री
- मिळणारी एकूण रक्कम -- 1500 रु.
वाहतूक, पॅकिंग, मजुरीवर होणारा खर्च -- 500 रु.
रोजचे निव्वळ उत्पादन सुमारे - 1000 रु.
सीमाताईंकडून काय शिकावे? - शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याची वृत्ती
- एकच पीक न घेता कमी जागेत, कमी वेळेत पाच ते सहा पिके घेऊन अधिक फायदा मिळविणे
- बांधावर लिंबू, आंबा, चिकू घेणे
- ग्राहकांना ताजा भाजीपाला कसा पुरवठा करता येईल याकडे विशेष लक्ष
- व्यापाऱ्यांशी चर्चा करून कोणत्या भाजीला, कोणत्या हंगामात अधिक मागणी असते याची माहिती घेणे
- शेतातील माती व पाणी परीक्षण करून घेतले आहे, त्यानुसार शेतीतील नियोजन केले जाते
शेतात रासायनिक खते वा कीडनाशके यांचा जराही वापर नाही, सेंद्रिय पद्धतीनेच शेती केली जाते.
शेतीतील उत्पन्नातून मालाच्या वाहतुकीसाठी पीक-अप व्हॅन, तसेच स्कॉर्पिओ व्हॅनही घेतली आहे.
सुमारे 20 शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे, त्यामाध्यमातून ग्राहक विस्तार करण्याचे उद्दिष्ट.
सध्या काही गुंठ्यांवर पॉलिहाऊस उभारले आहे, त्यात ढोबळी मिरची, काकडी घेतली जात आहे.
मुरमाड जमिनीत सीमाताईंनी फुलविलेली शेती पाहण्यासाठी राज्यातील तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू येथील असंख्य शेतकऱ्यांनी चिंबळीला भेट दिली आहे, त्यांना महाराष्ट्र सिंचन सहयोगच्या वतीने उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
कशी मिळवली थेट बाजारपेठ? सुरुवातीला कोरुगेटेड बॉक्समधून पुणे मार्केटला मालाची विक्री व्हायची; मात्र व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या कमी दरामुळे ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला. परदेशी भाजीपाल्याचा आस्वाद घेणारा ग्राहक उच्चभ्रू वर्ग आहे हे लक्षात आल्यानंतर सीमाताईंनी भोसरी परिसरातील एका मोठ्या सोसायटीत सर्व्हे केला. तेथील महिलांची बैठक घेऊन त्यांना आपला उद्देश समजावून दिला. त्यानंतर सामंजस्यातून थेट विक्रीची सुरवात झाली.
फ्लॅटधारक फोनवरच भाजीपाल्याची मागणी नोंदवतात. त्यानुसार भाजीपाल्याची काढणी करून मालपुरवठा होतो.
परदेशी भाजीपाला शेतीचा अनुभव - - ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा केल्यास ही शेती फायद्याची
- थेट ग्राहकांना विक्री, त्यामुळे चांगल्या दराची खात्री
- मार्केटिंग योग्य प्रकारे आवश्यक
- लागवडीमध्ये कायम सातत्य आवश्यक
आलेल्या अडचणी - - परदेशी भाजीपाल्याचे बियाणे लवकर उपलब्ध होत नाही
- मार्गदर्शनासाठी अनुभवी व्यक्तींची कमतरता
- मजूर समस्या भेडसावते, त्यामुळे काही वेळेस अधिक मजुरीही द्यावी लागते
पाळलेली पथ्ये - - ग्राहकांच्या मागणीप्रमाणे मालपुरवठा करण्याचे तंत्र आत्मसात केले
- लागवडीपासून विक्रीपर्यंतची सविस्तर माहिती घेतली
सीमाताईंचा दिनक्रम - पहाटे पाचच्या सुमारास उठणे
- सकाळची कामे व स्वयंपाक बनवणे
- सकाळी सहा वाजता मुलाला शाळेत सोडणे
- सकाळी साडेसातच्या सुमारास शेतात जाणे, तेथील नियोजन
- दुपारी एकच्या दरम्यान घरी येणे, जेवण
- दुपारी चारच्या सुमारास शेतात जाणे, मालतोडणी
- त्यानंतर पीक-अप व्हॅनमध्ये माल भरणे
- भोसरी येथील सोसायट्यांमध्ये महिला सहायकासोबत जाणे
- आदल्या दिवशी बुकिंग घेतलेल्या घरांमध्ये भाजीपाल्यांच्या बॅगा प्रत्यक्ष पुरवणे
- विक्रीचे सर्व काम आटोपून रात्री आठच्या सुमारास घरी येणे
- त्यानंतर स्वयंपाक तयार करणे
- त्यानंतर जेवण, घरातील आवराआवर व झोप
याशिवाय नेहमी असणारी कामे - मुलांचा अभ्यास घेणे
- दररोज फोनवरून ग्राहकांच्या भाजीपाल्याच्या ऑर्डर घेणे
- शेतात फवारणी करणे
- बियाणे आणून स्वतः रोपे तयार करणे
- शेतीविषयक प्रशिक्षण घेणे
सीमा जाधव - 9552727970
मु.पो. चिंबळी, जि. पुणे
पुणे जिल्ह्यातील चिंबळी (ता. राजगुरुनगर) येथे सौ. सीमा जाधव आपल्या 38 गुंठे क्षेत्रातील शेतीची जबाबदारी सांभाळतात. यात प्रत्येकी पाच गुंठे क्षेत्रावर त्यांनी भाजीपाला व त्यातही परदेशी भाजीपाल्याची शेती केली आहे. आपल्या शेतीमालाला ग्राहकांची थेट बाजारपेठही मिळवली आहे. दिवसभर आपले वेळापत्रक व्यस्त ठेवून आपल्या शेतीच्या विकासासाठी अखंड झटणाऱ्या सीमाताई या समस्त शेतकरीवर्गासाठी आदर्शच म्हणायला हव्यात.
सीमा जाधव यांचा विवाह चंद्रकांत जाधव यांच्याशी झाला तेव्हा घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचे पती चाकण परिसरातील कंपनीमध्ये तात्पुरत्या नोकरीवर कार्यरत होते. त्यांच्या अल्पशा पगारावर घरचा उदरनिर्वाह होत नव्हता. आपणही हातभार लावावा म्हणून तीन एकर खडकाळ, मुरमाड, उताराच्या व पडीक जमिनीवर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यातील 38 गुंठे जमीन ट्रॅक्टर मजुरांच्या साहाय्याने लागवडीयोग्य केली. सुरवातीला वांगी, मिरची व पालेभाज्या घेण्यास सुरवात केली. त्याची विक्री चाकण व भोसरी मार्केट येथे सुरू केली. वाहतुकीला 400 रुपये भाडे द्यावे लागे. भाजीपाल्याची तोडणी, खुरपणी, फवारणी, कीडनाशके यावर मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. हाती नफा फारच कमी लागे. त्याच वेळी परिसरातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्याकडून तीन दिवसांचे भाजीपाला लागवड ते विक्रीपर्यंत प्रशिक्षण मार्गदर्शन घेतले.
परदेशी भाजीपाल्याची सुरवात -- बाजारपेठेचा अभ्यास करून परदेशी भाजीपाला पिकवण्यावर भर दिला. बियाणे खरेदी करून आणून त्यांची रोपवाटिका तयार केली. स्वतः तयार केलेल्या रोपांची लागवड सुरू केली. यामध्ये गादीवाफा पद्धतीचा वापर केला.
शेतीतील नियोजन पाणी - शेतात पाण्याच्या सुविधेसाठी एक बोअरवेल घेतला. सध्या त्याला चांगल्या प्रमाणात पाणी आहे. मात्र, त्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्याचा संचही शेतात बसवला, त्यासाठी 40 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. बेडवरती ठिबकसह पॉलिमल्चिंग पेपरचा वापर केला. मल्चिंगमुळे खुरपणीचा त्रास कमी झाला. पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत झाली. पिकांना दररोज अर्धा तास ठिबकने पाणी दिले जाते.
पोषण, पीक संरक्षण व्यवस्थापन - सीमाताई सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवतात. त्यामध्ये गांडूळ खत, नीम पेड, करंज पेड यांचा वापर होतो. करंज पेंडीची खरेदी पिरंगुट, तर निमपेंड चाकण येथून आणली जाते. किडींच्या नियंत्रणासाठी गोमूत्र, निंबोळी अर्क आदींचा वापर होतो.
सुमारे 38 गुंठे क्षेत्रातील पिकांचे नियोजन - प्रत्येक पीक सुमारे पाच गुंठे क्षेत्रात
- ब्रोकोली, लाल कोबी, लीक, आईसबर्ग, चेरी टोमॅटो, लाल कोबी, ढोबळी मिरची, वांगी, कारली, काकडी आदी पिके मागणीनुसार वर्षभर क्षेत्र बदलून घेतली जातात
- मागणीप्रमाणे ताजा व चांगला भाजीपाला पुरवला जातो
सध्या मिळत असलेले दर (रुपये प्रति किलो) रेड कॅबेज - 40 ते 50 रुपये, कमाल 70 ते 80
ब्रोकोली - 40 ते 70 रुपये, कमाल 120
चायनीज कॅबेज - 40 ते 70 रुपये
लीक - 60, बहुतांशी पुणे मार्केटला माल जातो.
आईसबर्ग - 65 ते 70 रुपये
ढोबळी मिरची - 40 रुपये
साधी मिरची - 30 ते 40 रुपये
(ऋतूंप्रमाणे दरांत चढ-उतार होतात)
प्रति दिन जमा-खर्च - - दररोज सुमारे 100 किलो भाजीपाला विक्री
- मिळणारी एकूण रक्कम -- 1500 रु.
वाहतूक, पॅकिंग, मजुरीवर होणारा खर्च -- 500 रु.
रोजचे निव्वळ उत्पादन सुमारे - 1000 रु.
सीमाताईंकडून काय शिकावे? - शेतात वेगवेगळे प्रयोग करण्याची वृत्ती
- एकच पीक न घेता कमी जागेत, कमी वेळेत पाच ते सहा पिके घेऊन अधिक फायदा मिळविणे
- बांधावर लिंबू, आंबा, चिकू घेणे
- ग्राहकांना ताजा भाजीपाला कसा पुरवठा करता येईल याकडे विशेष लक्ष
- व्यापाऱ्यांशी चर्चा करून कोणत्या भाजीला, कोणत्या हंगामात अधिक मागणी असते याची माहिती घेणे
- शेतातील माती व पाणी परीक्षण करून घेतले आहे, त्यानुसार शेतीतील नियोजन केले जाते
शेतात रासायनिक खते वा कीडनाशके यांचा जराही वापर नाही, सेंद्रिय पद्धतीनेच शेती केली जाते.
शेतीतील उत्पन्नातून मालाच्या वाहतुकीसाठी पीक-अप व्हॅन, तसेच स्कॉर्पिओ व्हॅनही घेतली आहे.
सुमारे 20 शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे, त्यामाध्यमातून ग्राहक विस्तार करण्याचे उद्दिष्ट.
सध्या काही गुंठ्यांवर पॉलिहाऊस उभारले आहे, त्यात ढोबळी मिरची, काकडी घेतली जात आहे.
मुरमाड जमिनीत सीमाताईंनी फुलविलेली शेती पाहण्यासाठी राज्यातील तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू येथील असंख्य शेतकऱ्यांनी चिंबळीला भेट दिली आहे, त्यांना महाराष्ट्र सिंचन सहयोगच्या वतीने उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
कशी मिळवली थेट बाजारपेठ? सुरुवातीला कोरुगेटेड बॉक्समधून पुणे मार्केटला मालाची विक्री व्हायची; मात्र व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या कमी दरामुळे ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला. परदेशी भाजीपाल्याचा आस्वाद घेणारा ग्राहक उच्चभ्रू वर्ग आहे हे लक्षात आल्यानंतर सीमाताईंनी भोसरी परिसरातील एका मोठ्या सोसायटीत सर्व्हे केला. तेथील महिलांची बैठक घेऊन त्यांना आपला उद्देश समजावून दिला. त्यानंतर सामंजस्यातून थेट विक्रीची सुरवात झाली.
फ्लॅटधारक फोनवरच भाजीपाल्याची मागणी नोंदवतात. त्यानुसार भाजीपाल्याची काढणी करून मालपुरवठा होतो.
परदेशी भाजीपाला शेतीचा अनुभव - - ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा केल्यास ही शेती फायद्याची
- थेट ग्राहकांना विक्री, त्यामुळे चांगल्या दराची खात्री
- मार्केटिंग योग्य प्रकारे आवश्यक
- लागवडीमध्ये कायम सातत्य आवश्यक
आलेल्या अडचणी - - परदेशी भाजीपाल्याचे बियाणे लवकर उपलब्ध होत नाही
- मार्गदर्शनासाठी अनुभवी व्यक्तींची कमतरता
- मजूर समस्या भेडसावते, त्यामुळे काही वेळेस अधिक मजुरीही द्यावी लागते
पाळलेली पथ्ये - - ग्राहकांच्या मागणीप्रमाणे मालपुरवठा करण्याचे तंत्र आत्मसात केले
- लागवडीपासून विक्रीपर्यंतची सविस्तर माहिती घेतली
सीमाताईंचा दिनक्रम - पहाटे पाचच्या सुमारास उठणे
- सकाळची कामे व स्वयंपाक बनवणे
- सकाळी सहा वाजता मुलाला शाळेत सोडणे
- सकाळी साडेसातच्या सुमारास शेतात जाणे, तेथील नियोजन
- दुपारी एकच्या दरम्यान घरी येणे, जेवण
- दुपारी चारच्या सुमारास शेतात जाणे, मालतोडणी
- त्यानंतर पीक-अप व्हॅनमध्ये माल भरणे
- भोसरी येथील सोसायट्यांमध्ये महिला सहायकासोबत जाणे
- आदल्या दिवशी बुकिंग घेतलेल्या घरांमध्ये भाजीपाल्यांच्या बॅगा प्रत्यक्ष पुरवणे
- विक्रीचे सर्व काम आटोपून रात्री आठच्या सुमारास घरी येणे
- त्यानंतर स्वयंपाक तयार करणे
- त्यानंतर जेवण, घरातील आवराआवर व झोप
याशिवाय नेहमी असणारी कामे - मुलांचा अभ्यास घेणे
- दररोज फोनवरून ग्राहकांच्या भाजीपाल्याच्या ऑर्डर घेणे
- शेतात फवारणी करणे
- बियाणे आणून स्वतः रोपे तयार करणे
- शेतीविषयक प्रशिक्षण घेणे
सीमा जाधव - 9552727970
मु.पो. चिंबळी, जि. पुणे